

Pahalgam News
esakal
पहलगामची ती नयनरम्य बैसरन खोरे... २२ एप्रिल २०२५ या दिवशी पर्यटकांच्या आनंदी कोलाहलात लष्करे तैयबाच्या दहशतवाद्यांनी २६ निष्पाप जीवांचा बळी घेतला. आज या घटनेला एक वर्षे उलटून गेले. पण या हल्ल्यात सर्वस्व गमावलेल्या पुण्यातील गनबोटे कुटुंबाच्या घरात आजही तीच कातर शांतता आहे. काळ पुढे सरकला असला, तरी कौस्तुभ गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांच्या डोळ्यांतील अश्रू मात्र अजूनही आटलेले नाहीत.