

Pahalgam
esakal
श्रीनगर: जम्मू- काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला उद्या (ता. २२) एक वर्ष पूर्ण होत आहे. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी २५ पर्यटकांना धर्म विचारून त्यांना गोळ्या घातल्या होत्या. या हल्ल्याने अवघा देश हादरला होता. त्या घटनेच्या कटू स्मृती आजही देशवासीयांच्या मनात आहेत.