Pahalgam Terror Attack: आरंभ है प्रचंड! पाकिस्तानची घाबरगुंडी... सीमावर्ती भागातील रहिवाशांना अन्नधान्य साठवून ठेवण्याचे आदेश

Pakistan Food Stockpiling Directive : भारत-पाक तणावामुळे पाक-प्रशासित काश्मीरमध्ये सीमावर्ती भागात २ महिन्यांचा अन्नधान्य साठा करण्याचे आदेश. तणाव वाढल्याने सुरक्षा उपाय कडक.
India-Pakistan tension
India-Pakistan tensionesakal
Updated on

पाकिस्तान-प्रशासित काश्मीरमधील सीमावर्ती भागातील रहिवाशांना शुक्रवारी दोन महिन्यांचा अन्नधान्य साठा करण्याचे आदेश देण्यात आले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या महिन्यात २२ एप्रिल रोजी भारतीय काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानवर आरोप केले आहेत, तर पाकिस्तानने हे आरोप फेटाळले आहेत. या घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com