पाक कारगिलसारखी घुसखोरी पुन्हा करणार नाही : रावत

bipin_rawat
bipin_rawat

नवी दिल्ली : पाकिस्तान 1999 मधील कारगिलसारखी घुसखोरी पुन्हा करणार नाही, कारण त्यांना त्याचा परिणाम काय होतो हे माहीत आहे. सीमाभागात भारतीय लष्कर अत्यंत करडी नजर ठेवून आहे, असे मत लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी काल (शुक्रवार) व्यक्त केले. 

पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल युद्धातील विजयाला 20 वर्षे झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. येथील कोणताही भाग आपण सोडलेला नाही. आपल्या सैन्याच्या तुकड्या येथील प्रत्येक भागात गस्त घालत आहेत. पाकिस्तान पुन्हा कारगिलसारखी घुसखोरी पुन्हा करू शकतो काय, या प्रश्‍नाला उत्तर देताना रावत यांनी वरील मत व्यक्त केले. कारगिलसारखी गोष्ट पुन्हा पाकिस्तान करेल असे आपल्याला वाटत नाही, कारण त्याचे काय परिणाम होतात हे त्यांनी पाहिले आहे, असे रावत म्हणाले.

या वेळी रावत यांनी कारगिलमधील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गीतकार समीर याने तयार केलेल्या अल्बमचे प्रकाशन केले. यामध्ये बॉलिवूडचे नायक अमिताभ बच्चन आणि अन्य कलाकार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com