
भारत आणि पाकिस्तान एकाच वेळी स्वतंत्र झाले. देश एकच असल्यामुळे लोकांमध्ये काही फरक असा नव्हता. पण भारतात लोकशाही रुजली आणि आता जवळजवळ 78 वर्षे झाली भारत एक समर्थ राष्ट्र म्हणून उभा आहे पण पाकिस्तान मध्ये मात्र जनरल आयुब खान जनरल याह्या खान जिया ऊल हक, जनरल परवेज मुशर्रफ यांच्यासारखे अनेक लष्करी हुकूमशहा होऊन गेले पाकिस्तानमध्ये आर्मीने वारंवार देशाची सत्ता आपल्या ताब्यात घेतली भारतात मात्र आजपर्यंत असं कधीच झालं नाही.