

सिमला : सिमला कराराची स्वाक्षरी १९७२ मध्ये ज्या टेबलावर झाली, त्या राजभवनातील टेबलावरचा पाकिस्तानचा झेंडा आज गायब झाल्याचे दिसून आले. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्यानंतर भारताने सिंधू करार रद्द केलेला असताना दुसरीकडे पाकिस्तानने सिमला करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. याचे पडसाद भारतात उमटत आहेत.