राज्य सरकारविरोधातील याचिका फेटाळली 

court
court

नवी दिल्ली- महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. अशा प्रकारच्या मागण्यांकडे आम्ही लक्ष देऊ शकत नाही, असे न्यायालयाने सांगितले. ‘याचिकाकर्ते म्हणून तुम्हाला राष्ट्रपतींकडे विनंती करण्याचे स्वातंत्र्य आहे, पण इकडे येऊ नका’, असे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावले. 

महाराष्ट्राचा कारभार राज्यघटनेप्रमाणे चालत नसल्याने ते बरखास्त करावे, अशी मागणी विक्रम गेहलोत या व्यक्तीने केली होती. सुशांतसिंह प्रकरण आणि कंगना राणावत हिच्या कार्यालयाची तोडफोड अशी उदाहरणे देत याचिकाकर्त्यांनी हा दावा केला. मात्र, अशा काही घटनांमुळे राज्यघटनेचे पालन होत नाही, असे कसे म्हणता येईल? महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे, असे न्यायालयाने सुनावले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com