नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बिहार दौऱ्यावर असताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. पीएम-सीएम आणि मंत्र्यांना गंभीर गुन्ह्यांच्या आरोपाखाली ३० दिवसांपर्यंत तुरुंगात राहिल्यास पदावरून हटवणाऱ्या नवीन कायद्यावर त्यांनी भाष्य केले. पीएम मोदी म्हणाले, "एनडीए सरकारने भ्रष्टाचाराविरुद्ध असा एक कायदा आणला आहे, ज्याच्या कक्षेत देशाचा पंतप्रधानही येतो. या कायद्यात मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनाही समाविष्ट केले आहे."