PM Narendra Modi: देशाचा शत्रू कोठेच सुरक्षित नसेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी, तमिळनाडूमध्ये चोल राजाला अभिवादन

Tamil Nadu News: तमिळनाडूमध्ये चोल राजाच्या जयंतीनिमित्त बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताच्या सामर्थ्याचे दर्शन घडल्याचे सांगितले. देशाच्या शत्रूंना आता कोठेही सुरक्षित वाटणार नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले.
PM Narendra Modi
PM Narendra Modisakal
Updated on

गंगाईकोंडा चोलपुरम (तमिळनाडू) : ‘‘देशाच्या सार्वभौमतेवर हल्ला झाला, तर भारत त्याला जोरदार प्रत्युत्तर देतो, हे ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये जगाने पाहिले आहे. या सीमापार लष्करी आक्रमणामुळे देशाचाही आत्मविश्वास वाढला आहे,’’ असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काढले. तसेच, हल्ला करणारे दहशतवादी आणि भारताचे शत्रू यांच्यासाठी कोणतीही जागा सुरक्षित नाही, हेच या कारवाईतून सिद्ध झाले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com