वेळीच टाळेबंदी केल्याने लाखो जीव वाचले- मोदी

pm narendra modi today speake on this issue
pm narendra modi today speake on this issue
Updated on

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीयांशी संवाद साधला. भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेली स्फोटक परिस्थिती आणि कोरोनाबाधित रुग्णांची दिवसागणिक वाढणारी संख्या या पार्श्वभूमीवर मोदी आज काय बोलतील याकडे देशाचं लक्ष लागलं होतं. कोरोनाचे संकट निर्माण झाल्यापासून मोदी यांनी आज सहाव्यांदा जनतेशी संवाद साधला. यावेळी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी टाळेबंदी वेळीच लागू केल्याने मोठा अनर्थ टळल्याचा दावा केला आहे.  वेळीच टाळेबंदी लागू केल्याने लाखो लोकांचे जीव वाचले असं ते म्हणाले आहेत.

भारत आता अनलॉक-2 मध्ये प्रवेश करत आहे. या संदर्भातील मार्गदर्शन तत्वे सरकारकडून सोमवारी रात्री जारी करण्यात आले आहेत. यावेळी मोदी चीन संदर्भात काही भाष्य करतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी या विषयी बोलण्याचे टाळले आहे. 

पंतप्रधान मोदींच्या भाषणातले महत्वाचे मुद्दे

-वेळीच टाळेबंदी केल्याने लाखो जीव वाचले

-अनलॉक 1 सुरु झाल्यापासून नागरिकांचा बेजबाबदारपणा वाढला

-80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य पुरवढा केला

-देशात एकही नागरिक उपाशी पोटी झोपला नाही पाहिजे

- गेल्या तीन महिन्यात 20 कोटी नागरिकांच्या खात्यात 31 हजार कोटी जमा केले

-5 किलो गहु किंवा तांदूळ मोफत देणार, 1 किलो दाळही नोव्हेंबरपर्यंत देणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why did India waive cotton import duty?
Latest Marathi News Live Update
IMD monsoon delay forecast for India 2026
Mamata Banerjee reaction on Abhishek Banerjee attack
Marathi News Esakal
www.esakal.com