
India Pakistan Ceasefire: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचं पाणी तोडून मोठी कारवाई केली होती. यामध्ये सिंधू जल करार स्थगित करत भारतानं पाकिस्तानकडं जाणारं पाणी रोखलं होतं. पण आता दोन्ही देशांमध्ये युद्धविरामाची घोषणा करण्यात आली असून ती आजच संध्याकाळी ५ वाजल्यापासून लागूही झाली आहे. पण यामुळं भारतानं पाकिस्तानचं पाणी थांबवण्याचा घेतलेला निर्णयही मागे घेतला जणार का? जाणून घेऊयात नेमकं काय निर्णय झाला आहे.