
Flood-hit Punjab villages submerged under water as rescue teams carry out relief operations amid Prime Minister Narendra Modi’s scheduled visit.
esakal
पंजाबमध्ये आलेल्या पूरामुळे ४६ जणांचा मृत्यू झाला असून, लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. २,००० गावे पाण्याखाली गेली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पूरग्रस्त भागांचा दौरा करणार असून, पूरग्रस्त लोकांशी थेट संवाद साधणार आहेत.
मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
पंजाबमध्ये पन्नास वर्षातील सर्वातील सर्वात भयानक पूर आला आहे. सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. या नैसर्गिक आपत्तीत मृतांचा आकडा ४६ वर पोहोचला आहे, तर १.७५ लाख हेक्टरवरील उभी पिके उद्ध्वस्त झाली आहेत आणि २३ जिल्ह्यांमधील १,९९६ गावे पूर्णपणे पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमधील पूरग्रस्त भागांना भेट देणार असल्याची माहिती येत आहे.