rahul gandhi
sakal
नवी दिल्ली : ‘‘देशात सध्या आदेश आणि अभिव्यक्ती असा संघर्ष सुरू आहे. आता काँग्रेस आणि विरोधकांच्या विचारांची अभिव्यक्ती सुरू झाली आहे. ती थांबणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत विरोधक त्यांना शांततेत झोपू देणार नाहीत,’’ अशा शब्दांत काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढविला. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा अदानी आणि अंबानींचा नोकर असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली.