

rahul gandhi loksabha
esakal
नवी दिल्लीः ‘‘ अवघे जग हे अस्थिर कालखंडामध्ये प्रवेश करीत असताना देश विकला गेला आहे. भारताचा डेटा, शेतकरी, सॉफ्टवेअर अभियंते, लघू आणि मध्यम व्यावसायिक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आमचे लष्कर आणि ऊर्जा सुरक्षा विकली गेली आहे,’’ अशी घणाघाती टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज अर्थसंकल्पावरील चर्चेमध्ये भाग घेताना केली. दरम्यान याच मुद्यावरून केंद्र सरकारनेही आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले.