नवी दिल्ली : शेतकऱ्यांविषयी आम्ही सांगितले होते, की मोदी यांना कृषी कायदे वापस घ्यावे लागतील.आता काँग्रेस पक्ष म्हणत आहे, की मोदी यांना ही अग्निपथ योजना मागे घ्यावी लागेल. भारताचा प्रत्येक तरुण आमच्या बरोबर या कामात उभा होत आहे, असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नरेंद्र मोदी सरकारला दिला आहे. (Rahul Gandhi Criticize Narendra Modi Over Agnipath Scheme)
जी आमचे तरुण लष्कर, हवाई दल आणि नौदलात भरती होण्यासाठी रोज धावतात, त्यांना मी सांगू इच्छितो की भारताच्या पंतप्रधानांनी देशाच्या पाठीत खंजीर खुपसले आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर केली आहे. हा देश आपल्या तरुणांना आता रोजगार देऊ शकत नाही. भले सरकारने काहीही करो, असे गांधी म्हणाले.
एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही अग्निपथ योजनेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. सैनिकांना चौकीदार बनवण्याची इच्छा पंतप्रधानांची असल्याचे ते म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.