नवी दिल्ली : देशातील विरोधकांच्या आघाडीने मोदी सरकारविरोधातील अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. मणिपूरच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी विरोधकांच्या आघाडीने हा प्रस्ताव आणला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनाही आपली खासदारकी परत मिळाली आणि त्यांनी सरकारला या प्रश्नावरून धारेवर धरले होते. दरम्यान, अविश्वास प्रस्तावार लोकसभेत त्यांचे भाषण सुरू असताना बराच वेळ त्यांच्यावर कॅमेरा का नव्हता या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं आहे.
राहुल गांधी यांनी बुधवारी अविश्वासाच्या प्रस्तावावरून सरकारला धारेवर धरणारे भाषण केले. जवळपास ३७ मिनिटांच्या भाषणामध्ये राहुल गांंधी यांना टीव्हीवर फक्त १४ मिनीटे दाखवण्यात आले. तर इतर वेळेत लोकसभा अध्यक्षांंना टीव्हीवर दाखवण्यात आलं असा आरोप काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी केला आहे. यावरून राहुल गांधी यांनी अखेर मौन सोडलं असून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
"कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझा चेहरा बघण्याची इच्छा नसेल. पण तरीही ते लोकसभेत माझ्या व्हिडिओच्या संदर्भात बोलतात. नेमकं काय आहे माहिती नाही पण ते माझा चेहरा टीव्हीवर बघू इच्छित नाहीत असं मला वाटतंय" अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींवर ताशेरे ओढले आहेत.
मणिपूर मुद्द्यावर काय बोलले पंतप्रधान मोदी?
"मणिपूरच्या विकासासाठी आम्ही सक्षम आहोत. मणिपूरमध्ये अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत, त्या कुटुंबासोबत आम्ही आहोत. काँग्रेसमुळे नॉर्थ इस्ट भागाचा विकास होऊ शकला नाही, पंडीत नेहरू याला कारणीभूत आहेत" असं मोदी सभागृहात म्हणाले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.