Rahul Gandhi : रोजगार प्रोत्साहन योजना ‘जुमला’ होता काय?: राहुल गांधी; दररोज फक्त नवनव्या घोषणा

New Delhi : केवळ मोठ्या कंपन्यांकडे लक्ष देऊन, निष्पक्ष व्यापार करण्याऐवजी मित्र राष्ट्रांना प्रोत्साहन देऊन, वस्तूंचे उत्पादन करण्याऐवजी सुट्या भागांची जोडणी करून आणि स्वदेशी कौशल्याची उपेक्षा करून रोजगार निर्माण केले जाऊ शकत नाहीत.
Rahul Gandhi
Rahul GandhiSakal
Updated on

नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेरोजगारांना रोजगार देण्याच्या अनुषंगाने ‘रोजगार प्रोत्साहन योजने’चा गवगवा केला होता. मात्र वर्ष उलटून गेले तरी ही योजना नेमकी कशा स्वरूपाची राहणार, याचा उलगडा झालेला नाही. या योजनेसाठी तरतूद करण्यात आलेले दहा हजार कोटी रुपये परत गेले आहेत. रोजगाराच्या मुद्द्यावर मोदी किती गंभीर आहेत, हे यातून दिसून आले, असे सांगतानाच रोजगार प्रोत्साहन योजना हाही ‘जुमला’ होता काय? अशी विचारणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना उद्देशून केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com