
नवी दिल्ली : पाटणा येथे झालेल्या उद्योजक गोपाल खेमका यांच्या हत्येवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहार सरकारला लक्ष्य केले आहे. ‘‘बिहार ही देशातील गुन्हेगारीची राजधानी झाली आहे,’’ अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. ‘एक्स’वर राहुल यांनी नितीशकुमार यांना टीकास्त्र सोडले आहे. ‘‘येत्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना खाली खेचून येथील सरकार बदलण्याची आणि राज्य वाचविण्याची गरज आहे,’’ असे राहुल यांनी रविवारी एक्सवर म्हटले आहे.