Rahul Gandhi : राहुल गांधींनी माफी मागायला हवी;मंत्री रिजिजू, वैष्णव यांचा काँग्रेसवर घणाघात

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भाषणावर संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू, मंत्री अश्विनी वैष्णव आणि भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी जोरदार टीका केली.
Rahul Gandhi
Rahul Gandhisakal
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भाषणावर संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू, मंत्री अश्विनी वैष्णव आणि भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी जोरदार टीका केली. राहुल हे चुकीचे वक्तव्य करत असून ते समाजामध्ये खोटी माहिती पसरवीत असल्याचा आरोप त्यांनी केला. एक विरोधी पक्ष नेते या नात्याने राहुल अशाप्रकारची बेजबाबदार वक्तव्ये करू शकत नाहीत, त्यांनी त्याबद्दल माफी मागायला हवी असेही त्यांनी नमूद केले.

मंत्री रिजिजू म्हणाले की, ‘‘राहुल यांच्या सर्वप्रकारच्या बेजबाबदार वक्तव्यांना आम्ही तातडीने आक्षेप घेतला होता. राहुल चुकीचे बोलले असतील तर त्यांच्याविरोधात निर्देश द्या अशा प्रकारची विनंती लोकसभेच्या अध्यक्षांना केली होती. राहुल यांनी सभागृहाच्या नियमांचे पालन करायला हवे होते. लोकसभेचे अध्यक्ष बिर्ला यांनी देखील आपण गरजेनुसार योग्य निर्देश देऊ असे आम्हाला आश्वस्त केले आहे.’

’ भाजपचे नेते आणि खासदार सुधांशू त्रिवेदी यांनीही राहुल यांनी त्यांच्याच पक्षातील नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून योग्य ती शिकवण घ्यायला हवी असे सांगितले. शिंदे यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल सभागृहात माफी मागावी लागली होती याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

हिंदू धर्माचा अवमान केला

राहुल यांनी सगळ्या हिंदू समुदायाची माफी मागायला हवी कारण त्यांनी हिंदू धर्माचा अवमान केला आहे. राहुल यांची अशाप्रकारे बोलण्याची काही पहिली वेळ नाही काँग्रेसची ही जुनी रीत असल्याचे मंत्री वैष्णव यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.