
नवी दिल्ली : रामलीला मैदानावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप करीत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकारला युवकांची चिंता नसून सत्तेसाठी मतांची चोरी केली जात असल्याचा हल्लाबोल गांधी यांनी सोशल मीडियातून केला.