Rahul Gandhisakal
देश
Rahul Gandhi: रामलीला मैदानावरील घटनेवर राहुल गांधी संतप्त; सरकारला युवकांची चिंता नाही: राहुल गांधी
Delhi Protest: रामलीला मैदानावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारावर राहुल गांधींनी केंद्रावर हल्लाबोल केला. विद्यार्थ्यांच्या मागण्या न्याय्य असून सरकार युवकांच्या भविष्यासंबंधी गंभीर नाही, अशी टीका त्यांनी केली.
नवी दिल्ली : रामलीला मैदानावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप करीत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकारला युवकांची चिंता नसून सत्तेसाठी मतांची चोरी केली जात असल्याचा हल्लाबोल गांधी यांनी सोशल मीडियातून केला.