
नवी दिल्ली : पहलगामचा दहशतवादी हल्ला, त्यानंतर हाती घेण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर आणि नुकताच झालेला शस्त्रसंधी करार या पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन त्वरित बोलावले जावे, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवत केली आहे. दुसरीकडे राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले जावे, असे सांगतानाच पंतप्रधान मोदी सामील झाले तरच विरोधकांनी या बैठकीत सहभागी व्हावे, असा सल्ला दिला आहे.