

Raigad Family Tragedy in Kashi
Esakal
श्रावण महिन्यात वडिलांना काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यायचं म्हणून मुलाने पूर्ण तयारी केली. कुठे रहायचं, कधी परत यायचं याचं नियोजन केलं होतं. वडिलांच्या इच्छेखातर ठरवलेली तीर्थयात्रा कुटुंबासाठी अखेरची ठरली. वाराणसीत गेल्यानंतर गंगा आरती, काशी विश्वनाथ दर्शन झालं पण त्यानंतर अचानक अशा काही घटना घडल्या की तिघांवरही वाराणसीतच अंत्यसंस्कार करण्यात आले. आता त्यांच्या अंत्यसंस्काराचा व्हिडीओ समोर आला आहे.