

Railway General Coaches Sanitation
ESakal
भारतीय रेल्वेने आपल्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत प्रथम श्रेणी आणि एसी डब्यांमध्ये स्वच्छता बिनचूक असल्याचे अनेकदा दिसून येत होते. परंतु सामान्य डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना घाण आणि दुर्गंधीमध्ये प्रवास करावा लागत होता. परंतु आता ही परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे की, स्वच्छतेच्या बाबतीत कोणताही भेदभाव केला जाणार नाही.