

Family’s Temple Trip Ends in Tragedy, Four Killed in Ratlam Crash
Esakal
मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेवर रात्री उशिरा कार ट्रकला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात तीन महिलांसह चार जणांचा मृत्यू झाला. सर्वजण एकाच कुटुंबातले असून झाबुआहून खाटू श्याम दर्शनाला निघाले होते. कारवरचं नियंत्रण सुटल्यानंतर कार उलटली आणि त्यानंतर ट्रकला धडकली. अपघातात चौघांचा मृत्यू झालाय, तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील रतलाम इथं हा अपघात झाला. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.