

Rupali Chakankar
esakal
महाराष्ट्रात सध्या अशोक खरात प्रकरणाने मोठी चर्चा निर्माण केली आहे. या प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले. दरम्यान त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपली ठाम भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, ते निनावी पत्र ज्यांच्यावर आरोप करण्यासाठी वापरले जात आहे, ते पत्र संबंधितांकडे कसे पोहोचले?