
कटनी: मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील विजयराघवगड किल्ल्यामध्ये स्वातंत्र्यदिनी उलटा तिरंगा फडकवल्याचा प्रकार समोर आला आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त विजयराघवगड किल्ल्यावर आमदार संजय पाठक यांच्या हस्ते चुकीच्या पद्धतीने ध्वजारोहण करण्यात आले आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.