

BJP vs AAP conflict
ESakal
आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी राघव चड्ढा यांच्यासह पक्षाच्या सात राज्यसभा खासदारांच्या कथित बंडावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद केजरीवालांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी याला भाजपचे 'ऑपरेशन लोटस' म्हटले असून पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा एक कट रचण्यात आल्याचे म्हटले आहे. संजय सिंह यांनी असा आरोप केला की, अंमलबारी संचालनालयाच्या भीतीचा वापर करून राजकारण्यांना आपल्या बाजूने वळवले जात आहे. भगवंत मान यांचे सरकार चांगले काम करत आहे, परंतु काही लोक ते थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत.