
लग्नविधी पार पडल्यानंतर नववधू नवरदेवासोबत सासरी जाण्यास निघाली, तिने कारमध्ये पाय ठेवताच नवरदेवाला चक्कर आली आणि तो तिथेच बेशुद्ध पडला. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. दु:खद घटनेने लग्नमंडपात शोककळा पसरली, नववधूचे सुखी संसाराचे स्वप्न अवघ्या काही मिनिटांत भंगले. ही दुर्देवी घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली.