गोसाबा (सुंदरबन) : गुडघ्यापर्यंत येणारे पाणी आणि चिखलातून वाट काढत रीना सरकार या अत्यंत चपळाईने पावले टाकत सुंदरबनमधील सातजलिया बेटावरील दाट जंगलातून चालत जात खारफुटीची रोपे लावतात..हवामान बदलाचे परिणाम रोखण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमात रीना यांच्यासारख्या १५० स्थानिक महिला सहभागी झाल्या आहेत. रीना सरकार यांचे पती २०२२ मध्ये मासेमारीसाठी जंगलात गेले असता वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले. सुंदरबन परिसरात अशा हजारो महिला असून त्यांना सामाजिक बहिष्कार, आर्थिक अस्थिरता आणि मानसिक ताणाचा सामना करावा लागतो..अशातच आता हवामानामुळे होणाऱ्या बदलांचा सामानाही या महिलांना करावा लागत आहे. हवामान बदल, वाढता मानव–वाघ संघर्ष आणि सामाजिक बहिष्कार यांच्या कचाट्यात सापडलेल्या सुंदरबनमधील अशा महिलांचे जीवन आजही अत्यंत कठीण होत आहे, मात्र असे असूनही सातजलिया बेटावरील चारघेरी गावात रीना सरकारसारख्या सुमारे १५० महिला चिखलमय पाण्यातून वाट काढत २,००० खारफुटी रोपे लावत आहेत. पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमामागे स्वतःच्या जखमा भरून काढण्याचाही त्या प्रयत्न करत आहेत..Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर.अधिवास धोक्यातसुंदरबन परिसरात सुमारे ४५ लाख लोक राहतात. समुद्रपातळी वाढ, पाण्यातील क्षारता आणि तीव्र चक्रीवादळे यामुळे वाघांचे अधिवास कमी होत असून ते मानवी वस्त्यांकडे वळत असून, त्यातून मानव- वन्यजीव संघर्ष वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, दरवर्षी सुमारे ४० जण वाघांच्या हल्ल्याचे बळी ठरतात. २०७० पर्यंत हवामान बदलामुळे येथे वाघांसाठी योग्य अधिवास उरणार नाही, असेही अभ्यासातून दिसून आले आहे..या पार्श्वभूमीवर ‘पीईएचएस’ने २००९ पासून खारफुटीच्या रोपांची लागवड सुरू केली आहे. ‘पीईएचएस’चे संस्थापक उमाशंकर मंडल यांच्या मते, ‘आयला’ चक्रीवादळानंतर खारफुटी जंगलांचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते आहे. आतापर्यंत सहा बेटांवर ११ लाखांहून अधिक रोपे लावण्यात आली असून ५०० स्थानिक रहिवासी त्यांची देखभाल करतात. वाघाच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू झालेल्या अनेक महिलाही यात सहभागी झाल्या असून, वन्यजीव-मानव संघर्ष टळावा हीच त्यांच्या कामामागील मोठी प्रेरणा असल्याचे समाजसेवी संस्थांचे मत आहे..समस्यांचा डोंगरपुर्बाशा इको हेल्पलाइन सोसायटी (पीईएचएस) या स्वयंसेवी संस्थेच्या देबारोती दास सांगतात की, सुंदरबनमध्ये उत्पन्नाची साधने मर्यादित आहेत. अशातच वारंवार येणारी चक्रीवादळे येथील रहिवाशांची घरे उद्ध्वस्त करतात. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास नुकसानभरपाईची तरतूद असली तरी येथील अनेक पुरुष परवाना न घेताच जंगलात जातात त्यामुळे त्यांचा वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबांना भरपाई मिळत नाही. त्यामुळे अशा महिलांचे शोषण होते..Kolhapur City : सार्वजनिक वाहतूक सक्षम न झाल्यास कोल्हापूर आणखी मागे पडेल; वकिलांचा इशारा आणि ठोस मागण्या.सरकारी मदत हवीसुंदरबनमधील रहिवाशांना जीवनमान उंचावण्यासाठी अधिक शासकीय व सामाजिक पाठबळाची गरज आहे, असे मत रीना यांनी व्यक्त केले आहे. ‘‘संस्था धान्य आणि रोपे देते; पण पती गेल्यापासून मुलांचे पालनपोषण करणे कठीण झाले आहे,’’ असे रीना सरकार सांगतात..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.