

नवी दिल्ली - ‘उच्च न्यायालयांकडून निकाल राखून ठेवून ते अनेक महिने जाहीर न करण्याची प्रथा रूढ झाली आहे. ही एक निदानयोग्य अन् उपचारयोग्य व्याधी असून ती नष्ट केलीच पाहिजे,’ असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. वेळेवर न्यायदान होण्याची प्रथाच रूढ होण्याची गरज अधोरेखित करताना न्यायालयाने ही टिपणी केली.