Police Extortion Case : पोलीसच खंडणी वसूल करु लागले तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे जायचे? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिपण्णी

Supreme Court : सुप्रीम कोर्टाने पोलिसांकडून खंडणी उकळण्याच्या प्रकरणात तिन्ही अधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन रद्द केला. कोर्टाने स्पष्ट केले की कायद्याचे रक्षकच गुन्हेगार बनले तर नागरिक असुरक्षित होतात.
Supreme Court

Supreme Court

esakal

Updated on

सुप्रीम कोर्टाने पोलिसांच्या वसुलीबाबत कडक निरीक्षण नोंदवले आहे. एका सराफाकडून खंडणी उकळल्याच्या प्रकरणात तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा अटकपूर्व जामीन सुप्रीम कोर्टाने रद्द करताना ही महत्त्वाची टिपण्णी केली आहे. सुप्रीम कोर्टाने असे निरीक्षण नोंदवले की, जेव्हा कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारीच स्वतः खंडणीखोर बनतात, तेव्हा नागरिक पेचप्रसंगात सापडतात; कारण ज्या व्यक्तींचे कर्तव्यच त्यांचे रक्षण करणे हे आहे, त्याच व्यक्तींपासून स्वतःचे रक्षण करून घेण्यासाठी त्यांना धडपड करावी लागते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com