

रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना, कायदेशीर कागदपत्रांमध्ये वापरण्यात आलेल्या 'दुय्यम श्रेणीचा प्रवासी' (सेकंड-क्लास पॅसेंजर) या शब्दप्रयोगावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. न्यायालयाने हा शब्दप्रयोग भारतीय संविधानाच्या भावनेशी विसंगत असल्याचे नमूद करत संबंधित कुटुंबाला ८ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे रेल्वेला आदेश दिले.