जवानांच्या कुटुंबीयांची काळजी घेऊ - अमित शहा

Amit-Shah
Amit-Shah

नवी दिल्ली - निमलष्करी दलांतील जवान हे देशाचे संरक्षण करतात. आमच्या सरकारनेही त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचा निर्धार केला आहे, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निमलष्करी दलातील प्रत्येक जवानास किमान शंभर दिवस त्याच्या कुटुंबीयांबरोबर व्यतीत करायला मिळावेत, त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) नव्या मुख्यालयाच्या पायाभरणी समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

निमलष्करी दलांतील जवानांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुविधाही दिल्या जातील. निमलष्करी दलातील ३ लाख कर्मचाऱ्यांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करण्यात आले असून, देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे नेतृत्व हे याच सुरक्षा दलाकडे असते. देशातील नक्षलवाद्यांसोबत दोन हात करण्याचे कामदेखील याच सुरक्षा दलाकडून केले जाते, असे शहा यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, दिल्लीमध्ये लोधी रोड परिसरामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कार्यालयास लागून असलेल्या २.२३ एकर जागेवर हे मुख्यालय उभारले जात असून, त्यावर २७७ कोटी रुपये त्यावर खर्च केले जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com