Telangana Election Promise Horror
esakal
Telangana Election Promise Horror : निवडणुकीत दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी जवळपास ५०० कुत्र्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगणाच्या कामारेड्डी जिल्ह्यातील पाच गावात हा प्रकार घडला आहे. गावांतील सरपंचांनी लोकांना दिलेलं वचन पाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं आहे. एकाच आठवड्यात ५०० कुत्र्यांची ( Stray Dogs Killed) हत्या करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.