
जम्मू : भारत-पाकिस्तान संघर्षामुळे सीमेवरील तणाव अधिक तीव्र झाला असून सतत सुरू असलेल्या गोळीबारामुळे जम्मू भागातील किमान पाच जिल्ह्यांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. या गोळीबारात दोन दिवसांत १८ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ६० जण जखमी झाले आहेत.