
कटरा : ‘‘पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर भ्याड हल्ला करत एकप्रकारे मानवता आणि काश्मीरियतवर घाला घातला,’’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. या हल्ल्याच्या माध्यमातून देशात धार्मिक दंगली घडविण्याचा आणि पर्यटनावर अवलंबून असलेल्या लोकांंची उपजिविका हिरावून घेण्याचा पाकिस्तानचा डाव होता, असेही ते म्हणाले.