कोरोना महामारी संपण्याला अजून बराच काळ - आरोग्य मंत्रालय

जगभरात दखलपात्र कोरोना प्रकरणांची नोंद
Luv Agraval
Luv Agraval

नवी दिल्ली : जगातील एकूण परिस्थिती लक्षात घेता कोरोनाची महामारी संपण्याला अजून बराच काळ आहे, असं मत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी व्यक्त केलं आहे. जगभरात सध्या दखल घ्यायला भाग पडेल इतक्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ही काळजी वाढवणारी बाब आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपल्याला नियमांचं कडक पालन करणं गरजेचं आहे, असंही अग्रवाल यांनी आरोग्य मंत्रालयाच्या नेहमीच्या पत्रकार परिषदेत सांगितलं. (The Corona Pandemic is far from over Luv Agrawal aau85)

अग्रवाल म्हणाले, "भारतात सध्या कोरोनाच्या प्रकरणांमध्ये सातत्यानं आठवड्याच्या सरासरी आकडेवारीत घट होत आहे. पण जर आपण कमी होणाऱ्या केसेसची सुरुवातीपासून आत्तापर्यंत तुलना केली तर ती कमी होताना दिसते आहे. पण काही ठराविक भागात अद्याप संख्येत घट होताना दिसत नाहीए, याबाबत आम्ही राज्यांशी चर्चा करत आहोत."

देशात सध्या ६२ जिल्हे आहेत जिथे दररोज शंभराहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. ही ठिकाणं जिल्ह्यांमधील काही ठराविक ठिकाणीच दिसून येत आहे. यामध्ये २२ जिल्ह्यांचा समावेश आहे. ज्यात केरळातील ७, मणिपूरची ५, मेघालयाचे ३ जिल्हे आहेत जिथे गेल्या चार आठवड्यांपासून कोरोनाच्या प्रकरणात वाढीची नोंद होत आहे. ही बाब काळजीत टाकणारी आहे, असंही लव्ह अग्रवाल यांनी सांगितलं.

owners="Sakal" sort="relevance,recent" keywordsselector="h1.news-title" showInfoCard="true">

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com