
नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित करण्यासंदर्भात शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात कोणतीही तडजोड झालेली नाही. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी आज अकरा वाजता सिंघू बॉर्डरवर संयुक्त किसान मोर्चाची एक महत्त्वाची बैठक होत आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत, दर्शनपाल सिंग यांच्यासह महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द केल्यानंतर आंदोलन स्थगित करावे, यासाठी केंद्र प्रयत्नशील आहे. हरियाणा सरकारनेही शेतकऱ्यांशी चर्चा सुरू केली आहे. मात्र शेतकरी एमएसपी हमी कायदा आणि आंदोलन काळात बळी गेलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना भरपाई या मागणीवर ठाम आहेत. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार शेतकरी संघटनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या काहीच नेत्यांना फोन करून चर्चेसाठी आमंत्रित केले जात आहे, असा आरोप ऑल इंडिया किसान सभेचे सरचिटणीस हन्नान मुल्ला यांनी केला आहे.
संयुक्त किसान मोर्चाच्या काही नेत्यांमध्येही आता शेतकऱ्यांनी बॉर्डरवरून आपापल्या घरी गेले पाहिजे, असाही मतप्रवाह आहे. त्यामुळे आजची बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या बैठकीत आंदोलन पुढे सुरू ठेवायचे की नाही यावरही निवडा एक चर्चा होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.