टाइम कॅप्सुल ठेवणार की नाही? राम मंदिर ट्रस्टच्या सदस्यांमध्ये मतभेद

ram mandir.jpg
ram mandir.jpg

नवी दिल्ली- राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख जशीजशी जवळ येऊ लागली आहे, तसं या संदर्भातील घडमोडींना वेग येऊ लागला आहे. राम मंदिराचे भूमीपूजन 5 ऑगस्टला होणार आहे. या पार्श्वभूमीवर राम जन्मभूमी ट्र्स्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांनी मंदिराच्या बांधकामाबाबत माहिती देताना जमिनीच्या 2 हजार फूट खाली एक टाईम कॅप्सूल ठेवणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, राम जन्मभूमी ट्र्स्टचे महासचिव चम्पत राय यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.  

भारतात राम मंदिर भूमिपूजनाचा उत्सव, तर पाकिस्तानात 'काळा दिवस'
राम मंदिराच्या निर्मितीवेळी जमिनीच्या खाली कोणतेही कॅप्सूल ठेवले जाणार नाहीत. याबाबतची माहिती खोटी असून अशाप्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं जन्मभूमी ट्र्स्टचे महासचिव चम्पत राय यांनी म्हटलं आहे. एएनआयशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आज सकाळपासून माध्यमांमध्ये राम मंदिराच्या निर्मितीवेळी जमिनीत टाईम कॅप्सूल पुरले जाणार असल्याची माहिती देण्यात येत होती.

राम मंदिराची उभारणी जिथं होणार आहे तिथं 2 हजार फूट खाली जमिनीत एक टाइम कॅप्सूल ठेवण्यात येईल. भविष्यात कोणी राम मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास कऱणार असेल तर त्याला राम जन्मभूमीशी संबंधित खरी माहिती मिळेल. तसंच नविन कोणता वाद होणार नाही. हे कॅप्सूल एका ताम्रपत्रात ठेवण्यात येणार आहे, असं कामेश्वर चौपाल म्हणाले होते.  

राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी देशातील अनेक नद्यांचे पाणी आणि तिर्थस्थानांवरून माती आणली जाणार आहे. ज्या ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र गेले होते त्या नद्या, स्थाने याठिकाणांचा समावेश आहे. या पवित्र पाण्याने भूमीपूजनावेळी अभिषेक कऱण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. 

ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला भूमीपूजन करतील आणि पहिली वीट रचतील. या समारंभाला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भूमीपूजन हे एखाद्या सणाप्रमाणे साजरं करण्याची योजना आहे. असंही म्हटलं जात आहे की देशात घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये यावेळी दिवे आणि मेणबत्ती प्रज्वलित करण्याचे आयोजनही केलं जाऊ शकतं.

रशियाकडून चीनला धक्का; भारताला मात्र वेळेवर पुरवठा होणार
यापू्र्वी, लाल किल्ल्यातही जमिनीच्या ३२ फूट खाली एक टाईम कॅप्सूल ठेवण्यात आली आहे. १९७३ मध्ये तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते ही टाईम कॅप्सूल ठेवण्यात आलेली होती. इंदिरा गांधी यांनी १५ ऑगस्ट १९७३ रोजी लाल किल्ल्यात जमिनीच्या ३२ फूट खाली टाईम कॅप्सूल ठेवली होती. स्वातंत्र्यानंतरच्या २५ वर्षांच्या घटना पुराव्यांसह यामध्ये ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. इंदिरा गांधी यांनी इंडियन काऊंन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्चला मागील काळातील महत्त्वाच्या घटनांची नोंद करण्याचं काम सोपवलं होतं. परंतु त्यावेळी सरकारच्या या निर्णयावरून मोठा वादही झाला होता.

(edited by- kartik pujari)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com