

TMC
esakal
नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसमध्ये बंड केलेल्या २० खासदारांना पक्षांतरबंदी कायद्यातून वाचविण्यासाठी आणि त्यांचे लोकसभा सदस्यत्व अबाधित ठेवण्यासाठीच विलीनीकरणासाठी 'नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडिया'ची (एनसीपीआय) निवड करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच, या पक्षाचे अस्तित्व क्षुल्लक असल्यामुळे बंडखोर खासदारांना या पक्षावर नियंत्रण ठेवणेही सोपे ठरणार आहे.