नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या ३३४ प्रादेशिक पक्षांना नोंदणी यादीतून वगळले आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि स्वच्छ ठेवण्याच्या उपक्रमांतर्गत आयोगातर्फे या पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली. .केंद्रीय निव़डणूक आयोगाने या निर्णयाची घोषणा करताना स्पष्ट केले की १९५१ च्या लोकप्रतिनिधित्व कायद्यातील २९ (अ) कलमानुसार पक्षाची नोंदणी झाल्यानंतर सलग सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढली नसेल तर नोंदणीकृत पक्षांच्या यादीतून वगळता येते. यासोबतच राजकीय पक्षाच्या नाव, पत्ता, पदाधिकाऱ्यांची माहिती या तपशिलामध्ये कोणताही बदल झाल्यास त्याची माहिती निवडणूक आयोगाकडे देणे बंधनकारक आहे. .याआधारे निवडणूक आयोगाने जून महिन्यात राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना ३४५ पक्षांची पडताळणी करण्याचे आदेश जून महिन्यात दिले होते.पडताळणीनंतर प्रत्येक पक्षाला स्वतंत्र सुनावणी आणि स्पष्टीकरणाची संधी देण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेत ३३४ पक्ष आयोगाच्या अटींचे पालन करण्यात अपयशी ठरल्याने त्यांना नोंदणीकृत पक्षांच्या यादीतून वगळण्याचा निर्णय झाला..नोंदणी रद्द झाल्यानंतर संबंधित पक्षांना प्राप्तिकर कायदा, निवडणूक चिन्हे (आरक्षण व वाटप) कायदा, लोकप्रतिनिधित्व कायदा या अंतर्गत कोणताही लाभ मिळणार नसून या कारवाईवर आक्षेप असणाऱ्या पक्षांना ३० दिवसांच्या आत आयोगाकडे दाद मागता येणार आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.