आधीच्या सरकारकडून आसामला सावत्रपणाची वागणूक; मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Treatment of stepmother to Assam by previous government Modi targets Congress
Treatment of stepmother to Assam by previous government Modi targets Congress

या आधीच्या सरकारने आसामच्या उत्तरेकडील प्रदेशाला सावत्रपणाची वागणूक दिली त्यामुळे हा भाग अनेक सोयी-सुविधांपासून वंचित राहिला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. मोदींच्या हस्ते धेमजी येथे ३ हजार ३०० कोटी रुपयांच्या तीन बड्या पेट्रोलियम प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले, यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रदेशाच्या विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार अधिक समन्वयाने काम करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मोदी म्हणाले, स्वातंत्र्यानंतर ज्यांनी अनेक दशके या देशावर राज्य केले त्या मंडळींना दिल्लीपासून दिसपूर हे खूप दूर आहे असे वाटत होते. आता दिल्ली फार दूर राहिली नसून ती तुमच्या दारातच आहे. या आधीच्या सरकारने आसामच्या उत्तरेकडील प्रदेशाला सावत्र आईची वागणूक दिली त्यामुळे हा भाग आरोग्य सेवा, शिक्षण आणि उद्योग आदींपासून वंचित राहिला" आताही निवडणुकीच्या आधी जसे शक्य होईल तसे आपण आसाम आणि अन्य राज्यांना भेट देऊ असे आश्‍वासन मोदींनी यावेळी दिले.

दरम्यान, राज्यामध्ये गायींना मारणारी एक मोठी टोळी असून त्याला राज्य सरकारचेच संरक्षण असल्याचा आरोप मेनका गांधी यांनी केला होता. या आरोपाबाबत पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे, आसाम तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे, अशी मागणी आसाममधील काँग्रेस नेते भूपेश बगेल यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com