

Manipur Unrest
ESakal
मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद झाले. एक जखमी झाला. मणिपूरच्या राज्यपालांनी या हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले आणि त्याचा निषेध केला. हल्ल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. परिसर सील करण्यात आला आहे. लष्कर एक मोठी शोधमोहीम सुरू करू शकते.