UP Electionबाबत लालू प्रसाद यादव यांचं भाकित; म्हणाले, 'भाजपा...'

Lalu Prasad Yadav
Lalu Prasad Yadav

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज जाहीरनामा जाहीर केला. एकीकडे आज जाहीरनामा प्रसिद्ध केला असून दुसरीकडे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी यूपी निवडणुकीबाबत भाष्य केलंय. त्यांनी म्हटलंय की, उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) भाजपचा पराजय होणार आहे. भाजपच्या प्रोपगंडाला लोक कंटाळले आहेत. ते फक्त दंगली, धर्म आणि मंदिराबाबतच बोलत असतात. तसेच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची टिकण्यासाठी नितीशकुमार कोणत्याही थराला जाऊ शकतात, अशीही टीका त्यांनी केली आहे. (RJD chief Lalu Prasad Yadav)

Lalu Prasad Yadav
'केला असा आम्ही काय गुन्हा; पोटासाठी दिल्या तुम्ही मरण यातना, खाल्ले चार द्राक्षमणी म्हणून धाडीले यमसदनी मला !

भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला असून यात भाजपने ‘लोककल्याण संकल्प पत्र’ असे नाव दिले आहे. जाहीरनाम्यात मुलींना नियमानुसार स्कूटी, प्रत्येक घरातील व्यक्तीला नोकरी, विद्यार्थ्यांना निकषानुसार स्मार्टफोन आणि टॅबलेट देण्याचे आश्‍वासन दिले आहे.

लोककल्याण संकल्प पत्र प्रसिद्ध करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, की भाजपच्या डबल इंजिन सरकारमुळे उत्तर प्रदेशातील सर्व भागात कल्याणकारी योजना पोचल्या आहेत. २०१२ ते २०१७ या काळात उत्तर प्रदेशात ७०० हून अधिक दंगली झाल्या होत्या. शेकडो नागरिक मृत्युमुखी पडले होते. अनेक भागात संचारबंदी लागू असायची. व्यापाऱ्यांनी उत्तर प्रदेशातून पलायन केले होते. मुलींना शाळेत जाताना भीती वाटायची. आज पाच वर्षानंतर उत्तर प्रदेशातील हिंसाचार शांत झाला आहे.

Lalu Prasad Yadav
''महाराष्ट्रात कोविडमुळे डॉक्टर, नर्ससह 86 कोरोना योद्ध्यांचा मृत्यू''

आज उत्तर प्रदेशात संचारबंदीत नाही तर वाजत गाजत कावड यात्रा काढण्यात येतात, असे ते म्हणाले. भाजपच्या डबल इंजिन सरकारने गरीब लोकांना आजारपोटी येणाऱ्या खर्चातून मुक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आयुष्यमान भारततंर्गत राज्यातील सुमारे ७ कोटी नागरिकांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार करण्यात आले आहे. एकट्या जेवर भागात १८ हजार २४६ जणांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपचे घोषणापत्र हातात घेऊन किती आश्‍वासने पूर्ण केली, अशी विचारणा केली होती. आज आम्ही त्यास उत्तर देत आहोत. २०१७ रोजी आम्ही जारी केलेल्या संकल्प पत्रातील ९२ टक्के आश्‍वासने पाच वर्षात पूर्ण केली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com