Vistara चं होणार एअर इंडियात विलनीकरण?

टाटा सन्स कंपनी आणि सिंगापूर एअरलाईन्स विस्तरा एअरलाईन्स चालवतात
Air India
Air Indiasakal

विस्तरा एअरलाईन्सचं एअर इंडियामध्ये २०२३ पर्यंत विलीनीकरण होण्याची शक्यता आहे. टाटा सन्स कंपनी आणि सिंगापूर एअरलाईन्स विस्तरा एअरलाईन्स चालवतात. विस्तरा ही देशांतर्गत विमानसेवा देणारी कंपनी आहे. विस्तरामध्ये सिंगापूर एअरलाईनचं ४९ टक्के भागीदारी आहे, तर टाटा सन्सचे ५१ टक्के भागीदारी आहे. विलीनीकरणाची कल्पना सिंगापूर एअरलाईन्सलाही देण्यात आलीय.

त्यामुळेच आता टाटा सन्स विस्तराचं विलीनीकरण २०२३ अखेरिस पर्यंत करण्याची शक्यता वर्तविली जातेय. टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाईन्स दरम्यान या संदर्भात चर्चा देखील झाल्याचं सांगितलं जातंय.

टाटा ग्रुपने एअर इंडिया खरेदी केलीय. टाटा एअर इंडियाला उत्तम सर्विस प्रोव्हायडर बनवण्याचा प्रयत्न करतेय. एअर एशियातही टाटा सन्सची ८३ टक्केंची भागीदारी आहे. जानेवारी २०२२ मध्येच विस्तरा कंपनी एअर इंडियात विलिनीकरण होऊ शकतं असं सांगण्यात येत होतं. टाटा सन्स कंपनीचे डायरेक्टर भास्कर भट्ट यांनी ''विस्तरामध्ये कोणत्याही प्रकारचं हस्तक्षेप केल्याशिवाय एअरलाइन्स चालवणार असल्याचं म्हंटलंय'' , विस्तराचं विलणीकरण हे केवळ तर्क वितर्क असल्याचं त्यांनी सांगितलंय. कोरोनामुळे विलनीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली नाही. सिंगापूर एअरलाईन्सने २०२३ च्या अखेरिस पर्यंत हा निर्णय घेण्याची विनंती केल्याच सांगितलं जातंय. कोरोनामुळे हवाई प्रवासांवर मोठ्या प्रमाणात निर्बंध होते. त्यामुळे एअरलाइन्सचा व्यवसाय पूर्वपदावर आल्यानंतर निर्णयाची अंमलबजावणी केली जाऊ शकते.

७० वर्षांनंतर एअर इंडियाची मालकी पुन्हा मिळविल्यानंतर चांगली सेवा देण्याचा मानस टाटा सन्सने बोलून दाखविला होता. त्यामुळे वेगवेगळ्या एअरलाईन्समध्ये पैसा गुंतवण्यापेक्षा एकच एअरलाईन्समध्ये गुंतवणीकीचा विचार केला जातोय,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com