केंद्राचे काही निर्णय चुकले असतील, मात्र हेतू चांगलाच

जनतेचा देशाच्या लोकशाहीवर विश्वास वाढला हे नरेंद्र मोदी सरकारचे सर्वात मोठे यश आहे.
amit shaha program in pune
amit shaha program in pune sakal

नवी दिल्ली : मोदी सरकारचे काही निर्णय चुकीचे असू शकतात, मात्र सरकारचा हेतू नेहमीच स्पष्ट होता, असे मत गृहमंत्री अमित शहा ( Home Minister Amit Shah) यांनी व्यक्त केले आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (FICCI) च्या 94 व्या वार्षिक परिषदेत ते बोलत होते. 130 कोटी जनतेचा देशाच्या लोकशाहीवर विश्वास वाढला हे नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारचे सर्वात मोठे यश आहे, असेही शाह यावेळी म्हणाले. देशाच्या विकासात फिक्कीच्या योगदानाचीही त्यांनी प्रशंसा केली.

अमित शहा म्हणाले, 'सरकारचे काही निर्णय कदाचित चुकीचे असतील. पण हेतू चुकीचा नव्हता असे सागंत, ते म्हणाले की, सरकारवर भ्रष्टाचाराचा (Corruption) एकही आरोप नाही. सर्व संबंधितांशी सल्लामसलत केल्यानंतर सर्वच क्षेत्रात सुधारणा (Development) करण्यात आल्या आहेत. कोरोना (Corona) काळात सरकारने असे अनेक निर्णय घेतले आहेत, ज्याचा लोकांना दीर्घकाळ फायदा होईल.

अडीच वर्षांपासून 80 कोटी लोकांना प्रति व्यक्ती 5 किलो धान्य देण्याचे काम भाजपच्या नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारने केले असून, भारतीय अर्थव्यवस्था (India Economy) वेगाने सुधारत असल्याचे ते म्हणाले. चालू आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून, देशाचा आर्थिक दर दुहेरी अंकात येईल यात आश्चर्य वाटणार नसल्याचेही शहा यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com