रुबेलाचे कारण देत तुर्कीने परत पाठवला भारताचा गहू

Wheat sent back by Turkey citing rubella virus
Wheat sent back by Turkey citing rubella virusWheat sent back by Turkey citing rubella virus

एकीकडे जगभरातील देश भारताला गव्हाच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याची मागणी करीत आहे, तर दुसरीकडे तुर्कस्तानने (Turkey) भारतीय गहू (Wheat) खराब असल्याचे सांगून परत केला. २९ मेपासून ५६,८७७ टन भारतीय गहू भरलेली जहाजे तुर्कीतून गुजरातच्या बंदरांवर परत आणली जात आहेत. गव्हात रुबेला विषाणू (rubella virus) आढळल्याचे तुर्कीने म्हटले आहे. त्यामुळे ते परत पाठवत आहेत. याआधीही तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन यांनी काश्मीरवर भाष्य केले होते. (Wheat sent back by Turkey citing rubella virus)

तुर्कस्तानने फायटोसॅनिटरी चिंतेमुळे भारतीय गव्हाची खेप नाकारली आणि ती परत पाठवली. ही जहाजे तुर्कस्तानहून गुजरातमधील कंडाळा बंदरात परत येत आहेत. भारतातून आलेल्या गव्हामध्ये (Wheat) रुबेला विषाणू आढळून आला होता. त्यामुळे तुर्कीच्या कृषी आणि वन मंत्रालयाने त्याचा वापर करण्यास परवानगी दिली नाही, असे तुर्की अधिकाऱ्यांनी सांगितले. तुर्कीच्या (Turkey) या निर्णयामुळे भारतीय व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Wheat sent back by Turkey citing rubella virus
वडिलांनी हिसकावून घेतला मोबाईल; १५ वर्षाच्या मुलाने लावला गळफास

आतापर्यंत भारताच्या वाणिज्य आणि कृषी मंत्रालयांनी परिस्थितीवर भाष्य केलेले नाही. अधिकारी मानतात की भारतीय रूबेला वनस्पती रोग कोणत्याही आयातदार देशासाठी गंभीर चिंतेचे कारण असू शकते. मात्र, भारतीय गव्हाच्या बाबतीत हे एक दुर्मीळ उदाहरण आहे.

रुबेला विषाणू किंवा जर्मन गोवर हा विषाणूजन्य संसर्गजन्य रोग आहे. हे बऱ्याचदा शरीरावर विशिष्ट लाल पुरळ दर्शवते. यामुळे संसर्गजन्य रुग्णांमध्ये कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसून येत नाहीत. रुबेला विषाणूचा (rubella virus) संसर्ग ३-५ दिवस टिकू शकतो आणि जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकलतो, शिंकते किंवा नाक आणि घशातून स्त्राव होतो तेव्हा त्याचा प्रसार होऊ शकतो.

Wheat sent back by Turkey citing rubella virus
असदुद्दीन ओवैसींचा केंद्र सरकारवर निशाणा; करून दिली १९८९ ची आठवण

गव्हाच्या किमती खाली येऊ शकतात?

जग कोरोनाशी झुंज देत आहे. युक्रेन-रशिया यांच्यातील महायुद्धामुळे भारतीय गव्हाची मागणी वाढली आहे. यामुळे भारताला निर्यातीवर बंदी घालावी लागली. भारतीय गव्हातील (Wheat) रुबेला विषाणूचे आरोप चिंताजनक असू शकतात. रुबेलाच्या चिंतेमुळे तुर्कीने (Turkey) भारतीय गहू परत केल्याने आंतरराष्ट्रीय मागणीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे देशात आणि परदेशात गव्हाच्या किमती खाली येऊ शकतात.

एर्दोगन काय म्हणाले काश्मीरवर?

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासोबतच्या संयुक्त परिषदेत एर्दोगन यांनी पाकिस्तानची बाजू घेतली. काश्मीरबाबतच्या ठरावांना आपला पाठिंबा आहे आणि या दशकांहून जुना वाद संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार सोडवायचा आहे, असे ते म्हणाले. २०२३ पासून पाकिस्तान आणि तुर्की एकत्र युद्धनौका तयार करतील, असेही तुर्की राष्ट्रपतींनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com