असदुद्दीन ओवैसींचा केंद्र सरकारवर निशाणा; करून दिली १९८९ ची आठवण

Asaduddin Owaisi targets central government over target killings
Asaduddin Owaisi targets central government over target killingsAsaduddin Owaisi targets central government over target killings

काश्मीर (kashmir) खोऱ्यात टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. एकीकडे टार्गेट किलिंगमुळे काश्मिरी पंडित आणि स्थलांतरित लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे केंद्र सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आहे. अशात एमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी मोदी सरकारला जबाबदार धरत १९८९ ची आठवण करून दिली आहे. इतकेच नाही तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही केंद्र सरकारला घेरले आहे. (Asaduddin Owaisi targets central government over target killings)

मोदी सरकार इतिहासातून धडा घेत नाही आहे. सरकार १९८९ सारखीच चूक करीत आहे. १९८९ मध्येही राजकीय आउटलेट बंद करण्यात आले आणि खोऱ्यातील राजकारण्यांना बोलू दिले गेले नाही. तीच चूक ते करीत आहेत, असे असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी ट्विटमध्ये पलायनाचा व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे.

१९८७ च्या निवडणुकीत हेराफेरी झाली आणि त्याचा परिणाम १९८९ मध्ये दिसला होता. काश्मिरी पंडितांना माणूस म्हणून नव्हे तर निवडणुकीचा मुद्दा म्हणून पाहतात. स्थानिक राजकारण्यांना ते बोलू देत नाहीत. अशा गोष्टी दहशतवादाला वाव देत आहेत. याची जबाबदारी मोदी सरकारवर आहे, मी त्याचा निषेध करतो, असेही ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले.

Asaduddin Owaisi targets central government over target killings
संतूर वादक भजन सोपोरी यांचे निधन; अनेक दिवसांपासून होते आजारी

भाजपने काश्मीरला सत्तेची शिडी बनवली

बँक व्यवस्थापक, शिक्षक आणि अनेक निष्पाप लोकांचा दररोज बळी जात आहे. काश्मिरी पंडित स्थलांतरित होत आहेत. ज्यांना त्यांचे संरक्षण करायचे आहे त्यांच्याकडे चित्रपटाच्या प्रमोशनपासून वेळ नाही. भाजपने काश्मीरला सत्तेची शिडी बनवली आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी तातडीने पावले उचला, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधताना लिहिले.

टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये वाढ

काश्मीर (kashmir) खोऱ्यात टार्गेट किलिंगच्या (target killing) घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी कुलगाममधील बँकेच्या शाखेत घुसून दहशतवाद्यांनी व्यवस्थापक विजय कुमार यांची हत्या केली. मंगळवारी शाळेतील शिक्षिका रजनी बाला यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. एवढेच नाही तर राहुल भट्ट यांची हत्याही दहशतवाद्यांनी तहसील आवारातच घुसून केली होती. या घटनांमुळे काश्मिरी पंडित आणि स्थलांतरित लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com