चीनमधून ६०० भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणणार

Corona-Virus
Corona-Virus

नवी दिल्ली - जीवघेण्या कोरोना विषाणूच्या उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर चीनच्या हुएई प्रांतातील ६०० भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यास आजपासून सुरुवात होऊ शकते. यासाठी दोन विशेष विमाने तयार ठेवण्यात आली असून चीनच्या सरकारकडून औपचारिक होकारानंतर या विद्यार्थ्यांना भारतात आणले जाईल. 

हुवेई प्रांतात सुमारे १२०० भारतीय विद्यार्थी आहेत. कोरोना विषाणूच्या उपद्रवानंतर यातील आतापर्यंत ६०० हून अधिक जणांना चीनमधील भारतीय वकिलातीतर्फे मायदेशी येण्यासाठी संपर्क साधण्यात आला. त्यांच्यासाठी दोन विशेष विमानेही तयार ठेवण्यात आली असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी साप्ताहिक वार्तालापादरम्यान सांगितले. 

चीनमधील कोणत्याही भारतीय नागरिकाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याची आतापर्यंतची माहिती आहे. १५ जानेवारीनंतर चीनमधून भारतात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय चाचणी केली जाईल. त्यानंतरच प्रवेश दिला जाईल. अशा प्रवाशांना किमान १४ दिवस एकांतवासात निरीक्षणाखाली ठेवले जाईल. केंद्रीय मंत्रीमंडळ सचिवांनी आज याबाबत घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com