अभिनंदन यांना वीरचक्र, तर प्रकाश जाधवांना किर्ती चक्र

abhinandan
abhinandan
Updated on

नवी दिल्ली : बालाकोट कारवाईनंतर पाकिस्तानचे विमान पाडणारे हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्र, तर बेळगावचे भारतीय लष्करातील जवान प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कित्ती चक्राने सन्मानित करण्यात येणार आहे.

भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सरकारकडून लष्करातील पुरस्कांची घोषणा करण्यात आली आहे. 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या 'एफ-16' विमानाबरोबर झालेल्या हवाई युद्धात 'मिग-21'मधून बाहेर पडताना विंग कमांडर वर्धमान जखमी झाले होते. ते पाकिस्तानच्या ताब्यात असताना भारताने त्यांना सोडावून आणले होते. त्यांच्या कामगिरीचे देशभर कौतुक करण्यात आले होते. आता त्यांच्या या शौर्याची दखल घेत सरकारने त्यांना वीर चक्राने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

अभिनंदन यांच्यासह 1 राष्ट्रीय रायफल्सचे हुतात्मा जवान प्रकाश जाधव यांना मरणोत्तर किर्ती चक्र देण्यात येणार आहे. तसेच लष्करातील आठ जवांना शौर्य चक्र दिले जाणार आहे. त्यातील पाच जणांना शौर्य चक्र मरणोत्तर दिले जाईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com